🎾 प्रत्येकाने लिहून ठेवा ही विनंती.
🎾घसा दुखत आहे ?
घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण
पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी
कमी होते.
🎾घसा खवखवणे- बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला
होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि
चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून
चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.
खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा
गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे.
🎾 कफ
झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व
मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.
🎾तोंड येणे, तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे.
तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात
जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन
दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,
सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन
हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला
की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ
कमी होण्यासही मदत मिळते.
🎾घशात जळजळ, घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे.
बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या
गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.
🎾 पाय दुखणे
मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट
सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण
पाहातो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर
हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.
🎾पोटदुखी
ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते.
लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते.
अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर
तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र
गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून
त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो
🎾चरबी कमी करा
> शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.
> साहित्य : १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.
> कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.
> हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.
> फायदे :
> ०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.
> ०२) हाडे मजबूत होतात.
> ०३) काम करण्यास स्फूर्ती येते.
> ०४) डोळे तेजस्वी होतात.
> ०५) केसांची वाढ होते.
> ०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.
> ०७) रक्ताभिसरण चांगले होते.
> ०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.
> ०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.
> १०) बहिरेपणा दूर होतो.
> ११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.
> १२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.
> १३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.
> १४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.
> १५) नपुंसकता असेल तर ती दूर होते.
> १६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.
> १७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.
> १८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.
> १९) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.
> २०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.
> २१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
> २२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.
> २३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर
कृपया वाचा आणि लिहुन ठेवा
●●●● उपयोग होईल ●●●●
▪▪..आरोग्य टिप्स..▪▪
१) अम्लपित्त वाढलले असता ऊस खावे अथवा ऊसाचा रस प्यावा त्वरीत पोट साप होते. तसेच ऊस जेवना पुर्वी खाल्यास पित्त वाढ होत नाही.
2) आवाज बसला असता बारीक वस्त्रगाळ केलेला कात दोन घोट पाण्या सोबत घ्यावा त्वरीत घसा साफ होतो.
3) काविळ झाला असल्यास एक आठवडाभर रोज एक-दोन ऊस चाऊन खावे, किंवा दिवसातून ३/४ ग्लास ऊसाचा रस घेतल्याने रक्त तयार होण्याची क्रिया चालु होउन रूग्न बरा होतो. तसेच ताज्या गुळवेलीचा रस २० ग्रॅम खडीसाखर घालुन घेतल्यास सुध्दा काविळ बरा होतो.
४) सतत कान फुटत आसल्यास ऊसाचे कांडे गरम करून नंतर त्याचा रस काढून दोन- तिन चमचे कानात पिळल्यास कान फुटने कायमचे बंद होते.
५) केस येण्यासाठी व कोंडा नाहीसा होन्यासाठी :– वडाच्या कवळ्या पारंब्या वाटुन १०० ग्रॅम लगदा करावा त्यात एक लिटर तिळाचे तेल व ५० मि.ली. लिंबरस घालुन मंदाग्नीवर कढवावे. नुसते तेल राहीले असता ते गाळुन घ्यावे हे तेल नियमीत लावल्याने नविन केस यायला सुरूवात होते. व कोंडा सुध्दा नाहिसा होतो.
६) मुख दुर्गंधी :- तुरटिच्या पाण्याने गुळण्या केल्याने मुख दुर्गंधी तर जातेच व तोडाचे सर्व आजार सुध्दा दुर होतात.
७) दात दुखी :- वडाच्या पारंबिचे दातवन केल्याने दाताचे सर्व आजार बरे होतात. दाताचे किडने थांबते, दाताचे कवच पुन्हा तयार होते.
८) दमा :- दम्याचा त्रास असनाऱ्या रूग्नाने लवंग तोंडात ठेउन ति नरम झाल्यास खावी, असे एक-एक तासाने एक-एक लवंग खात रहावे दमा कमी कमी होत जाउन १/२ महिन्यात कायमचा नाहिसा होतो.
९) पोट साफ होण्यासाठी :- लसणच्या ८/१० पाकळ्या वाटुन तुपात तळुन सैधव लावुन दिवसातुन १/२ वेळेस खाल्याने पोट साप होते. तसेच तिळाचे तेल रोज अनशा पोटी २० मिली घेतल्याने पोट साप तर होतेच पण पोटाचे आन्सर सुध्दा बरे होतात.
१०) पोट दुखी :- आल्याचा रस, लिंबाचा रस व सैधव किंवा पादेलोन घालुन घेतल्याने पोट दुखायचे थांबते. तसेच हे मिश्रन रोज जेवना पुर्वी घेतल्याने अन्न पचन होन्यास मदत होते. हा उपक्रम जर एक वर्ष चालु ठेवला तर घशा पासुन गुद्दव्दारा पर्यत कॅन्सरची बाधा कधीच होनार नाही.
११) बल्डप्रेशर :- ६/७ लसणाच्या पाकळ्या आर्धा लिटर पाण्याच्या बाटलित टाकुन ति बाटलित हालवावी व नंतर दोन तास ठेवावी व त्या नंतर जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा हे पाणी प्यावे याने हाय बल्डप्रेशर कमी होउन नॉर्मल होतो.
१२) मुळव्याध :- रोज सकाळी तुळशीची पाने खल्याने मुळव्याध बरा होतो.
१३) मुतखडा :- पानफुटिचे पान व सोबत एक काळा मिरा असे दिवसातुन तिन वेळा खाल्याने मुतखडा १५ दिवसात गळुन पडतो.
▪नोट :-▪
मुतखडा असलेल्या व्यक्तीनी खालील वस्तु खावु नये –
१) आवळा २) चिकु ३) भेंडी
४) पालक ५) गोबी ६) काकडी
७) स्ट्रॉबेरी ८) वाटान्याच्या शेंगा
९) टोमॅटो १०) काळी द्राक्षे ११) काजु १२) कॉफी पिउ नये १३) मशरूम १४) वांगे.
कारण यात खूप कॅल्शियम जास्त असते.
▪माहीती संकलन व प्रसारण ▪ हिन्दवी चँरिटेबल ट्रस्ट
- इंद्रायणीनगर-भोसरी - पुणे
✅हार्ट अटॅक..???
घाबरू नका..!!!
सहज सुलभ उपाय...!
99 टक्के ब्लॉकेजेसना काढून टाकणारे पिंपळाचे पान...💚15 पिपळळाची पाने जी गुलाबी नसावीत,पण हिरवी,
कोवळी, चांगली वाढलेली असावीत...प्रत्येक पानांचे
वरचे टोक व खालचा जाड देठ पानाचा थोडाश्या भागासकट कापून टाका, मग सर्व पंधरा पाने
स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात ही पाने व एक ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवा.जेव्हा पाणी(1/3)
एक त्रितीयांश उरेल तेव्हा उकळवणे बंद करा व गाळून घ्या...नंतर थंड जागी ठेवा.झाले आपले औषध तयार...!
☕...☕...☕हा काढा 'तीन भागात' प्रत्येक तीन तासांनी
सकाळपासून घ्यावयाचा आहे.💔हार्ट अटॅक नंतर लागोपाठ पंधरा दिवस अशा प्रकारे पिंपळकाढा घेतल्याने
ह्रदय पुनः स्वस्थ होते💝 व पुन्हा हा दौरा पडण्याची
शक्यता राहात नाही...ह्रदय विकारी व्यक्तींनी ह्या ईलाजाचा प्रयोग अवश्य करून पहावा.. यातून कोणताही
साईड इफेक्ट होत नाही..!
💚पिंपळाच्या पानात ह्रदयाला शक्ति आणि शांती देण्याची अदभूत क्षमता आहे..!💚ह्या पिंपळकाढ्याचे
तीन डोस सकाळी 8.00वा., 11.00वा., व 2.00वा. म्हणजे दर तीन तासांनी घ्यावयाचे आहेत....💙डोस घेण्यापूर्वी
पोट रिकामी असता कामा नये. हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.
💜सदरच्या पंधरा दिवसांत तळलेले पदार्थ,भात व्यर्ज आहेत...तसेच मांस, अंडी, दारु, धुम्रपान पूर्णतः बंद करावीत... मीठ व तेलकट पदार्थ सेवन करू नये...
💖डाळींब, पपई, आवळा, लसूण, मेथी, सफरचंद,मोसंबी, रात्री भिजवलेले काळे चणे, गुगूळ,
मनुका,दही, ताक इ. घ्यावे...
"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!"भगवंताने पिंपळाचे पान
💚ह्रदयाच्या आकाराचे कां बनविले आहे..?
हे आर्टीकल आपल्या पर्यंत Dr.Devendra Sathe
यांनी पाठवले आहे..!!!
🌴 आरोग्य वार्ता🌴
"पाणी पिण्याची योग्य वेळ"
● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर शरीरातील उर्जेला Activateकरतो.
● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -ब्लड प्रेशर त्रास संपवतो.
● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -पचनक्रिया सुधारतो.
● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -हार्ट अटैक पासुन वाचवतो.
जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा.* प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.* दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांनाअधिकप्रमाणातऑक्सिजनमिळतो.* अशा वेळी खोकत राहिल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. कृपया जास्तीत जास्त लोकांना हि पोस्ट शेअर करा.का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात.....!!!
👏👏💥👏👏
सहाधारी व अष्टपैलु भेंडी /
रोज लावावी तोंडी//
भेंडी मला न आवडणारी पण औषध म्हणून सुप प्यायच ठरलेल.
ऐकदा अभिरुची व्हेजमध्ये भेंडीफ्राय मिसेस नी आॕर्डर केली .तेव्हापासुन त्या भेंडीफ्रायच्या ऐवढ प्रेमात पडलो की आता आॕर्डर तेवढीच मागविली जाते.
कुणी पंढरपूरचे असेल कींवा पांडुरंगास दर्शनास आले तर अभिरुचीमध्ये भेंडीफ्राय खायच विसरु नकाच.
स्वानुभव--
1)डेंगुत प्लेटलेट्स कमी होतात त्यात पपई रस व भेंडी सुप अप्रतिम गुण.
2)आजारपणातुन उठल्यावर भेंडीसुप व जीरे तब्येत ठणठणीत करते.
3)मुलांना स्मरणशक्ती साठी भेंडीचा चिकयुक्त सुप खुप गुणकारी.
4)धातुपुष्ट होण्यास व शुक्राणु वाढण्यास बळामुळ, मुसळी, ढोरगुंज मुळी अल्फाअल्फा ,चुर्णासोबत कोवळ्या पाच सहा भेंडी चाउन खावी.
5)आमवातावर भेंडीमुळ खडीसाखरेत सोबत.
आता ईतर माहीती व रेसीपी बघुया
* काही भागांमध्ये भेंडीच्या कापलेल्या देठांना पीण्याच्या पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी अनुशापोटी हे पाणी पितात . उरलेल्या भेंडीच्या देठांना फेकून दिले जाते . मधुमेह नियंत्रण आणण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे .
* भेंडीच्या बीयांना एकत्रित करून घ्यावे . त्यानतंर त्यांना उन्हात वाळवावे . वाळल्यानंतर त्यांना बारीक वाटून घ्यावे . या बीयांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते आणि उत्तम शरीरासाठी हे उपयुक्त असते . या चुर्णाला लहान मुलांना खाऊ घातल्याने ते एका टॉनिकप्रमाणे काम करते .
* वंध्यत्व दूर करण्यासाठी पुरूषांना कच्ची भेंडी खाण्याचा सल्ला दिला जातो . शारीरिक कमतरता दूर करण्यासाठी भेंडी चांगला उपाय असल्याचे आदिवासी मानतात .
* भेंडी मध्यभागी कापून , लिंबूचा रस अर्धा चमचा , डाळींब आणि भूई आवळ्याची पाने ( ५-५ ग्रॅम ) रात्रभर १ ग्लास पाण्यात ठेवा . त्यानंतर सकाळी या सर्वांचे चांगल्या प्रकारे मिश्रण बनवून दररोज दोन वेळा असे सात दिवस घ्यावे . या उपचाराने कावीळ एका आठवड्यात बरी होते .
ताप आणि सर्दी - खोकल्यावरही हा एक चांगला रामबाण उपाय आहे .
व्हिटॅमिन ' सी ' या भाजीत मुबलक असते . आकडेवारीच पाहायची तर १०० ग्रॅम भेंडीमधून शरीरासाठी आवश्यक असलेले जवळपास ३८ टक्के व्हिटॅमिन ' सी ' सहज मिळते . या व्हिटॅमिनमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून अनेक आजारांपासून संरक्षण होते . म्हणून संत्री व आवळा यातून जसे व्हिटॅमिन ' सी ' मिळवता तसेच भेंडी खाऊनही मिळवता येईल .
• भेंडयांमध्ये पेक्टिन हे सोल्युबल फायबर भरपूर असते . त्यामुळे रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन हृदयविकाराचा धोका टाळता येतो . शिवाय या भाजीत पॉलिफिनोलसारखे ऍण्टीऑक्सिडंटही खूप असतात . त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते . • भेंडीमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण इतर भाज्यांपेक्षा जास्त असते . या भाजीमुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ करणारे फ्री रॅडिकल्स नष्ट होण्यास मदत होते . त्याचबरोबर भेंडीमधील सोल्युबल फायबरमुळे पचनक्रिया सुधारून आतडयांच्या कॅन्सरची शक्यता कमी होते . • भेंडीमधील फायबरमुळे पचन चांगले होऊन रक्तातील साखर योग्य प्रकारे शोषली जाते व साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते . भेंडीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असल्याने ती इन्सुलिनचा स्राव वाढवते .
भेंडी ( Lady's finger , Okra ) बाजारात गेलं की कोवळ्या कोवळ्या भेंड्यांच्या जुड्या आशाळभूतपणे आपल्याकडे बघत आहेत , असं वाटतं . ते हिरवेगार वाटे बघितले की मोह आवरत नाही आणि भेंडी आपल्या पिशवीत कशी प्रवेश करते , ते समजत नाही . इजिप्त , ब्राझील , उत्तर अमेरिका , इराक , इराण , जॉर्डन , अरब देश , भारत अशा जगातल्या बहुतेक ठिकाणी भेंडीची लागवड होते . काही भेंड्या सहाधारी असतात , तर काही अष्टधारी . भेंडीतील चिकटा जाण्यासाठी व्हिनेगर वा लिंबाच्या रसाचा उपयोग बहुतेक ठिकाणी केला जातो . भेंडीच्या पानांचा रस हा सूप्सना घट्टपणा आणण्यासाठी होतो . सिंगापूरसारख्या देशात भेंडीचा उपयोग फिश , सूप्स व नूडल्स सर्व्ह करताना होतो . काही देशांत भात , मका व मीठ शिजविताना भेंडी घालतात . जपान , ब्राझीलमध्ये भेंडी म्हणजे श्रीमंती खाणे समजले जाते . अमेरिकेत तर भेंडीची पाने सॅलडमध्ये वापरतात . भेंडीच्या बियांमध्ये तेल असते . त्याचाही वापर स्वयंपाकात केला जातो . भेंडीत कर्बोदकाचे प्रमाण जास्त असून त्यात प्रथिनेही आहेत . पाणी भरपूर असलेली भेंडी आपल्याला फायबरही देते . या भाजीत ' क ' आणि ' अ ही जीवनसत्त्वे आहेत . तसेच फोलेट , कॅल्शियम , लोह व मॅग्नेशियम देणारी ही भाजी खरंच खूप गुणकारी आहे . भेंडी खाल्ल्याने लघवीला साफ होते . भेंडीत कॅलरीज कमी असल्याने खाताना फारसा विचार करण्याची गरज नाही ( फक्त पाककृतीत तेलाचे आखडते प्रमाण असावे . ) . तरी त्या पौष्टिक आहेत , पथ्यकरही आहेत . भेंडी आंबट , उष्ण व रुचिकर आहे .
ताकद येण्यासाठी रोज सकाळी ५, ६ भेंड्या खाव्यात . भेंडीतील बुळबुळीत गर रंगामध्ये घालायला उपयोगी पडतो .
अशी ही पथ्यकर भेंडी आपल्या जेवणात आलटून - पालटून हवीच . पण कशी ? तर ती अशी.
१ ) भेंडीची भाजी : भेंडी धुवून - पुसून चिरावी . पातेलीत फोडणी करून त्यावर बारीक चिरलेला कांदा घालावा . मीठ घालून वाफ द्यावी . आता त्यात भेंडीचे तुकडे आणि ओले खोबरे घालून झाकण ठेवून भाजी शिजवावी . अधूनमधून ढवळावी . भाजीला तार सुटू देऊ नये .
२ ) उपासाची भाजी : भेंडी चिरून घ्यावी . पातेलीत तूप - जिऱ्याची फोडणी करून मिरच्यांचे तुकडे तडतडावेत . त्यावर जिरे , कोथिंबीर व मिठाचे वाटण घालून ढवळावे . मग भेंडीच्या फोडी व दाण्याचे कूट घालून भाजी ढवळावी व झाकण ठेवून शिजवावी . अधूनमधून ढवळावी .
३ ) दही भेंडी : भेंडी चिरून मीठ घालून शिजवावी . तूप - जिऱ्याची फोडणी करून त्यावर हिरवी मिरची व कोथिंबिरीचे वाटण परतावे . त्यावर शिजविलेली भेंडी व दाण्याचे कूट घालून चांगले ढवळत तार नाहीशी होऊ द्यावी व मग ही भेंडी दह्यात घालावी .
४ ) भेंडीची करी : तेल तापवून त्यावर भेंडीचे तुकडे परतून घ्यावेत . पातेल्यास चिकटू देऊ नयेत . गॅस बारीक करून त्यावर बारीक चिरलेला कांदा , हळद , तिखट , मीठ , मिरी पावडर व काळा मसाला घालून झाकण ठेवून कांदा शिजवावा . नंतर करी जेवढी पातळ हवी असेल त्या प्रमाणात पाणी घालून उकळी आणावी .
५ ) खरपूस भेंडी : एका पातेलीत अंडी व हॉट सॉस फेटून घ्यावे . त्यात भेंडीचे तुकडे घालून ढवळावे . भेंडीला सर्व बाजूंनी अंड्याचे आवरण तयार होईल . दुसऱ्या पातेलीत कॉर्नफ्लोअर , मीठ , मिरी पावडर एकत्र करून त्यात वरील भेंडीचे तुकडे घोळवावेत आणि तळावेत . कागदावर निथळू द्यावेत . खरपूस भेंडी तयार !
६ ) टोमॅटो सॉसमधील भेंडी : पातेलीत तेल घेऊन त्यावर भेंडीचे तुकडे परतावेत . ते काढून पेपर नॅपकीनवर ठेवावेत . आता उरलेल्या तेलात मोठा चिरलेला कांदा , लसूण व टोमॅटो परतून घ्यावा . आता त्यात मीठ , मिरी पावडर , पाणी व लिंबाचा रस घालून उकळी आणावी . हा सॉस डिशमध्ये घालून त्यात भेंडी एकत्र करावी व सर्व्ह करावी .
७ ) बेक्ड् भेंडी : भेंडीचे तुकडे बटरमध्ये परतून घ्यावेत . बेकिंग डिशमध्ये खाली उकडलेले कॉर्न , त्यावर भेंडीचे तुकडे , त्यावर व्हाईट सॉस ( कॉर्नफ्लोअर , . दूध आणि बटर यांचे मिश्रण ) , त्यावर ब्रेड क्रम्स , मिरी पावडर आणि किसलेले चीज असे थर रचून ३५० डिग्रीला ४० मिनिटे बेक करावे .
८ ) भेंडी मसाला : यासाठी भेंडी कोरडी पुसून उभी अर्धवट चिरावी . बाजूला ठेवावी . आता बारीक चिरलेला कांदा तेलावर परतावा . त्यात ओले खोबरे , मीठ , चिरलेला कढीपत्ता , कोथिंबीर , हिरव्या मिरच्या , धणे , हळद , गरम मसाला , आले - लसूण पेस्ट , भाजलेले तीळ , लिंबाचा रस हे सर्व एकत्र करावे . हे मिश्रण कापलेल्या भेंड्यांमध्ये भरावे . आता ही भेंडी कुकरमध्ये ठेवून एका शिट्टीवर शिजवावी अथवा ती तेलावर परतत शिजवावी . पोळीबरोबर वा भाकरीबरोबर खावी .
९ ) भेंडीची भजी : या भज्यांसाठी छोट्या व कोवळ्या भेंड्या घ्याव्यात . त्या पुसून कोरड्या कराव्यात . एका पातेलीत कॉर्नफ्लोअर , मीठ , तिखट , ओवा , जिरे यांचे मिश्रण करावे व पाण्यात कालवावे . आता एकेक भेंडी पिठात घोळवून तळावी . कुरकुरीत होते . टोमॅटो सॉसबरोबर छान लागते .
१० ) भेंडी - तिळाचे लोणचे : प्रथम भेंडीचे तुकडे , मीठ , लिंबाचा रस व हळद एकत्र घोळवून बाजूला ठेवावे . दहा मिनिटांत त्याला पाणी सुटेल . ते पूर्ण काढून टाकावे व त्यात भाजलेले तीळ व तिखट घालून चांगले ढवळावे . मोहरीची फोडणी करावी . ती गार झाल्यावर मिश्रणावर ओतून ढवळावे . लोणचे तयार ! दोन दिवस टिकते . फ्रीजमध्ये ठेवावे .
माहिती रेसीपी [जसच्या तशी]-भाज्यांविषयी सारंकाही .. अर्थात भाज्यांचे अंतरंग लेखिका डॉ.विद्या जोशी.
टिप-
माहिती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.
आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
लेखकाने आयुर्वेद ग्रंथ व अभ्यासातील औषधे पुस्तकांचा समावेश लेखात केला आहे. काही औषधीत वाळलेले काष्ट, पंचांग उपयोगात येतात त्यामुळे औषध वनस्पती झाडांचा फोटो टाकतांना गुगल सर्च चा उपयोग केला तर वनस्पती फोटो चुकु शकतात कृपया चुक झाल्यास कळवावे.
डाॕ.लिलाधर देवराव उगले
पन्नासवर्ष अविरत होमीओपॕथी सेवा.
डाॕ.कैलास लिलाधर उगले
पंचवीस वर्षे आयुर्वेद हर्बल संशोधनात्मक उत्पादन व अॕक्युंपंक्चर सेवा.
कु.कीर्ती कैलास उगले
student of B.A.M.S.