बुधवार, ८ मार्च, २०२३

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्वातंत्र्याच्या भारतातील आद्य उद्गात्या होत्या. ज्या कालात महिलांना गोषातच रहावे लागे, शिक्षणावर बंदी होती त्या काळात मल्हाररावासारख्या ख-या पुरोगाम्याने अहिल्येला शिकवले. नुसते लिहिणे-वाचणे नव्हे तर अहिल्यादेवी भालाफेकीत इतक्या तरबेज झाल्या कि खुद्द टिपू सुलतानानेही त्याबाबत गौरवोद्गार काढले. "तत्वज्ञ महाराणी" हा किताब त्याने अहिल्यादेवींना दिला. 
अहिल्यादेवी तेथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी अन्य महिलांनाही लष्करी शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र काढले. महिलांच्या लष्करी प्रशिक्षणासाठी जगात निघालेले हे पहिले विद्यालय. त्या काळात देशभर संतती नसलेल्या विधवांची मालमत्ता सरकार दरबारी जमा करायचा कायदा होता. अहिल्यादेवींनी तो कायदा रद्द तर केलाच पण विधवांना कोणतेही मुल दत्तक घेण्याचीही कायदेशीर तरतूद केली. महेश्वरला वस्त्रोद्योगात आघाडीवर आणत असतांनाच महिला विणकरांनाही प्रोत्साहन दिले. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. ती मोडून काढण्यासाठी त्यांनी स्वत:च्या मुलीचा प्रौढ विवाह करुन स्वत: आदर्श घालून दिला. एवढेच नव्हे तर जो तरुण माळव्यातील दरवडेखोरांचा उपद्रव नष्ट करीन अशा कोणाही युवकाशी तिचा विवाह लावून देईन असे दरबारात घोषित करून जातीची अटही काढून टाकली. हे काळाच्या फार पुढचे पाऊल होते हे आम्ही कधीच लक्षात घेतले नाही.महिला सबलीकरण म्हणजे काय हे त्यांनी अठराव्या शतकात कृतीतून दाखवले. आजच्या सरकारांनाही त्यापासून शिकायला हवे.
युरोपात एकोणिसाव्य शतकापर्यंत स्त्रीया दास्यातच होत्या. काही लेखिका स्त्री स्वातंत्र्याबद्दल दबकत बोलत असल्या तरी त्यांचे सामाजिक स्थान दुय्यमच होते. युरोपातील महिलांना जोन माल्कममुळे अहिल्यादेवी माहित झाल्या. युरोपातील महिलांसाठी हे नुसते आश्चर्य नव्हते तर त्यांनी अहिल्यादेवींत आपले आदर्श पाहिले. इतके कि जोआना बेली या इंग्रज कवयित्रीने अहिल्यादेवींवर खंडकाव्य लिहिले. विदेशी साहित्यिकाने कोणाही भारतीयावर लिहिलेले हे पहिले खंडकाव्य. युरोपातील स्त्रीयांच्या स्वातंत्र्यलढ्याचा आदर्श निर्माण करणारी महिला अहिल्यादेवी असुनही आमच्यासमोर त्यांची प्रतिमा केवळ हातात पिंड घेतलेली साध्वी अशी निर्माण केली गेली. थोडक्यात खरा आदर्श पुसला गेला. भारतीय स्त्रीयांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली असती तर परंपरावाद्यांचे तेंव्हाच नाक ठेचले गेले असते व आज महिला अधिक आत्मसामर्थ्याने जगल्या असत्या. 
कोणाच्या हातून काही काढून घेतले तर त्याला पर्यायही दिला पाहिजे हे सूत्र अहिल्यादेवींनी घालून दिले. भिल्ल समाज त्याकालात यात्रेकरुंना लुटून उपजीविका चालवत. अहिल्यादेवींनी त्यांचे मन वळवून त्यांच्यावरच यात्रेकरुंच्या रक्षणाची जबाबदारी सोपवत यात्रेकरुंकडुन भिलकवडी नावाचा कर घ्यायची परवानगी दिली. एवढेच नव्हे तर त्यांना कसायला जमीनीही दिल्या. 
आज भारतातील वंचितांचे असंख्य पारंपारिक रोजगार नष्ट झाले अथवा केले गेले तरी त्यांना जगायचे अन्य पर्याय दिलेले नाहीत. आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्याच पारंपारिक व्यवसायांत पुरवले नाही. सर्वांना नोकरीची गाजरे तेवढी दाखवली. वंचितांचे अधिक वंचितीकरण होत त्यांची ससेहोलपट मात्र होत आहे. येथे अहिल्यादेवींचे आदर्श घेत पर्याय उपलब्ध करुन दिले पाहिजेत. पण या अहिल्याबाई सांगणे त्यांच्या अडचणीचे आहे.
-संजय सोनवणी

सोमवार, ६ मार्च, २०२३

तुकोबाच्या हत्येचा पंचनामा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    *🏴 तुकोबाच्या हत्येचा पंचनामा 🏴*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

*🚩 धुलीवंदन ! एक पूर्णसत्य !*

*लेखक : शैल जेमिनी कडू*

तुझा नावाने शिमगा घालू का? का रे, माझ्या नावाने शिमगा करतोस? ह्या म्हणी तुम्ही सरांस ग्रामीण भागात ऐकल्या असतील. याचे खरे कारण शिमगा करणे म्हणजे.. खोटी बोंब उठविणे आणि नेमके हेच झाले आहे आमच्या जगत गुरु तुकोबांच्या बाबतीत.

मनुवादी, सनातनी आणि कर्मठ असलेल्या भटांनी प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या, आपल्या अभंगातून लोकांचे प्रबोधन करून लोकांना खरा ‘देव’ दाखविणाऱ्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना कायमचे वैकुंठात पाठविण्याच्या खोट्या पराक्रमाला शिमगा घालू का? असे म्हणतात. हि म्हण सोळाव्या शतकात प्रचलित झाली आहे.

धार्मिक सण होळी.. धुळवड.. आणि याच वेळेस धुलीवंदन या दिवशी मंबाजी भट आणि सालोमालो भट व कंपूने तुकाराम महाराजांची हत्या केली आणि इंद्रायणी नदीत महाराजांचा देह सोडून दिला. अन नंतर अशी आवई उठवली कि, तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला निघून गेले.

इंद्रायणीच्या डोहात रडले मासे
सांगा ओ सांगा वैकुंठीचे विमान कसे होते?

सतराव्या शतकात विमान येणे व त्याचा चालक गरूड होता यावर कोणत्याही जिवंत माणसाचा विश्वास बसणार नाही, कारण तेव्हा तंत्रज्ञान जन्माला आले नव्हते. प्रगत नव्हते.

तुकाराम महाराज यांची हत्या करताना ‘पांडू मांग’ नावाच्या तरुणाने बघीतली होती. गावात येवून त्याने तुकारामांच्या पत्नीला सांगितलं होते. पण भटांनी आवई उठवली महाराज वैकूंठाला गेले, बरे गेलेच असे समजले तरी ते भटांच्या पोथीनुसार. एकादशी सारख्या पवित्र दिवशी न जाता धुलवडीला अभद्र दिवशी का गेले होते?

ते विमान वैकूंठावरून आले होत म्हणे. मग आतापर्यंत च्या इतिहासात एकदाच का आले? मग आता काय त्याची फेरी बंद पडली का? कि वैमानिक फरार आहे?

बरे आपण मानले तुकाराम महाराज वैकूंठाला गेले मान्य आहे, मग सर्व जगात फक्त तुकाराम महाराज यांचा बोलबाला व्हायला पाहीजे होता. एकाही बामणाच्या तोंडात तुकाराम महाराजांचे नाव का येत नाही?

सर्व बामन रामदासाला गुरु मानतात. किती ब्राह्मण देहुला दर्शन घ्यायला जातात?

आळंदी इतका विकास देहूचा का झाला नाही? कारण ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण व तुकाराम कुणबी मराठा. बहुजन होते हे मराठ्यांनो का लक्षात घेत नाही? उभ्या जगात ही एकमेव घटना घडली मग बामणांच्या तोंडी रामदासाचेच का नाव येते? आषाढी एकादशीला ज्ञानेश्वरांच्या पालखी समोर, तुकोबाची आरती का होवू दिली जात नाही?

नाही वैकुठासी गेला, 
तुका मारुनी टाकला !
डाव्या हाताचा कलंक, 
उजव्या हातानी झाकला !

अंधश्रद्धा, कर्मकांड आणि वैदिक व्यवस्थे विरुद्ध तुकोबांनी बंड केले होते. ते विद्रोही होऊन लोकांना जागृत करीत होते. तुकोबांचे अभंग लोकांच्या तोंडपाठ झाले. दिवसेंदिवस तुकाराम महाराज यांची लोकप्रियता वाढत होती. लोकांना कर्मकांड, थोतांड यातील सत्य समजू, उमजू लागले. याउलट सनातनी आणि भोंदू लोकांची दुकाने बंद पडू लागली, लोक त्यांना झिडकारू लागले. याचा राग येवून तुकारामांची हत्या मंबाजी भट व इतरांनी केली व आवई उठवली कि, तुकाराम वैकुंठाला गेला !

इंद्रायनीचा मासा विचारतो नभा
वैकुंठाला तुका नेला कैसा ।
माझा भोळा देव कारे तु चोरला 
मोह कैसा आवरला नाही तुला ।
मारोनी त्यासी भट झाला थोर
जीवासी खेळ कैसा केला ।
दादा म्हणे माझा तुका देहभाव
गाथा रुपी अमर जगी झाला ।

© खरा इतिहास

*लेखक : शैल जेमिनी कडू*

*संदर्भ : तुकोबाच्या हत्येचा पंचनामा*

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬